Share

‘शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी-पवार सारखेच’; राजू शेट्टींचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी प्रश्नी सध्या आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर त्यांनी खरमरीत टीका केली आहे. शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी, पवार सारखेच आहेत, किंबहूना त्यांचं एकमत आहे, अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे.

ऊसाची एफआरपी एकरकमी देण्यात यावी असा आग्रह राजू शेट्टींनी धरला आहे. मात्र एकरकमी एफआरपीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा नाही. गुजरातमध्ये तीन हप्ते दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, असे शरद पवार म्हणाले होते. या पवारांच्या विधानावर राजू शेट्टींनी टीका केली आहे.

शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी उसाच्या पोत्यावर काढलेले कर्ज दिसतं मग ऊस पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज का दिसत नाही? एरवी एकमेकांविरोधात बोलणाऱ्यांचं एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी शेतकरी विरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधी शड्डू ठोकणारा पहिला मी असेन, असेही राजू शेट्टी म्हणाले.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट घातला आहे. त्याला राज्य सरकारने संमती दिली आहे. एरव्ही केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येतात, असा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!