Share

Legislative council election : “भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात पण…” ; एकनाथ खडसेंचे सुचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणुकीवरून (Maharashtra legislative council election 2022) भाजप आणि सत्ताधारी शिवसेना (Bjp vs Shiv sena) आज आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र यावेळी दोन्ही पक्षाकडून विजयाचा दावा केला जात आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या प्रकरणाला नकार दिला असून विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात असून 284 आमदार मतदान करणार आहेत. सर्व पक्षांनी आपल्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सुचक वक्तव्य केले आहे.

भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. पण पक्षाला सोडून ते मला मतदान करतील, अशी परिस्थिती नाही”, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला फटका बसला होता. पण यावेळी तसं होणार नाही. प्रत्येक आमदार पक्षाच्या आदेशानुसारच मतदान करेल. भाजपाचे अनेक आमदारांशी माझे चांगले संबंध आहेत. ते संपर्कात आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी ते पक्षाला सोडून मला मतदान करतील अशी परिस्थिती सध्या नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विधान परिषद निवडणुकीसाठी एकही संधी सोडू इच्छित नाही. दोन्ही पक्षांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे पक्षांतराची शक्यता टाळण्यासाठी पक्षांनी आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे.

रविवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट नसल्याचा विश्वास व्यक्त केला. क्रॉस वोटिंग शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले होते, ‘राज्यसभेतील पराभव दुर्दैवी होता. राज्यसभेत शिवसेनेची मते विभागली गेली नाहीत. काय चूक झाली हे आम्हाला माहीत आहे. आमच्यात मतभेद नसल्याचे विधान परिषद निवडणुकीत दाखवून देईल.

काय आहे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे गणित?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार असून, 11 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत. त्याचवेळी भाजपचे पाच उमेदवार तयार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील विधानसभेची सध्याची संख्या पाहता 9 उमेदवारांचा विजय निश्चित आहे. मात्र दहाव्या जागेवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!