लातूर : महाराष्ट्राच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी लातुर जिल्हा सज्ज झाला आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत ४५ मल्लांनी शड्डु ठोकत आपले कौशल्य पणाला लावले. या ४५ पुरुष मल्लांनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवीला. शुक्रवारी लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे ही जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली.
महाराष्ट्राची महत्वाची आणि अतिशय मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा लवकरच आयोजीत केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी लातुर जिल्हा सज्ज झाला आहे. कोरोना संसर्ग काळात मल्लांनी घरीच कसरत करुन आपली लय कायम ठेवली होती. पण या काळात जवळपास नऊ महिने स्पर्धा बंद होत्या. त्यामुळे अनेक खेळाडू हिरमुसले होते. पण महाराष्ट्र केसरीच्या निमीत्ताने लातुर जिल्ह्यात पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी लातुरचा संघ निवडण्यासाठी शुक्रवारी जिल्हास्तरीय चाचणी घेण्यात आली होती. यावेळी खुल्या गटाच्या चाचणीत ४५ मल्लांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन हे राज्य कुस्तिगीर परिषदेचे उपाध्यक्ष नागनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र केसरी स्पर्धा केवळ खुल्या गटातच होणार आहे. इतर वयोगटाच्या स्पर्धेचा कार्यक्रम आजुन जाहिर झाला नाही. आण्णासाहेब मुळे, विठ्ठल सूर्यवंशी, देशमुख, रंगनाथ अंबुलगे आदींनी यावेळी पंच म्हणुन काम पाहिले.
महत्वाच्या बातम्या
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचा वाद : बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे?
- …म्हणून कर्णधार कोहलीने बुमराहला दुसऱ्या कसोटीत दिली नाही संधी
- एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मनपा आढावा बैठकीत आकृतीबंध मंजूरीची शक्यता
- टेस्लाकडून नवीन मॉडेल लाँच ! कार खरेदी साठी ‘या’ देशात सरकार देणार निम्मे अनुदान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
