Share

पुरग्रस्तांसाठी कोकण महामंडळाचा पुढाकार, ८२०५ घरांची लॉटरी काढणार

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे गेल्याकाही दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत केल आहे. त्यात अनेक ठिकाणी पूर आला. आणि अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्या दुर्घटना स्थळांना राजकीय पक्ष मदतीचा हात देत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला होता, अनेकांचं सांत्वन केलं होते. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

आता कोकण महामंडळ देखील मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे. त्यांनी ८ हजार २०५ घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ९७% घरे अत्यल्प व अल्प गटांसाठी असून गरिबांसाठी घर देण्याचे म्हाडाचे स्वप्न कोकणामध्ये पूर्ण केले जाईल. २३ ऑगस्ट रोजी जाहिरात काढली जाणार असून १४ ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर केली जाईल तसेच यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के तर अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरे निश्चित करण्यात आली आहेत. सदर घरे ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरा रोड, विरारमधील बोळिंज, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे ही घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

तसेच, या सोडतीमध्ये अर्जाची किंमत ५६० रु. असून अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार व उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार असेल. ही संपूर्ण सोडत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!