Share

निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना आणि राणेंच्या घराण्याचा वाद हा वारंवार समोर आला आहे. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून राणे कुटुंबीय हे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे हे शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात.

आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात महापूर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या वर्तनावरून राणे कुटुंबीयांनी प्रहार केला होता. तसेच, उद्धव ठाकरे यांचा देखील एकेरी उल्लेख केला होता. आता भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर पलटवार केला आहे. शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन नारायण राणेंनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवल्याचा खोचक टोला जाधव यांनी लगावला आहे.

यासोबतच, ‘नारायणराव राणेंना सल्ला देऊन काही फायदा होणार नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असंच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या महाराष्ट्रात पक्ष वेगवेगळे असू शकतात. मतभिन्नता असू शकते. पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण राणेंबद्दल बोलायला मला इच्छासुद्धा होत नाही.’ असं भाष्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!