औरंंगाबाद : पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर चार जणांनी सौरभ प्रविण मुंडे (वय २५, रा.जि.प.शाळेजवळ, जोगेश्वरी) या युवकास चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन जणांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जोगेश्वरी येथे घराजवळ सौरभ मुंडे हा पाणी भारत असतांना त्याचा पाटील यांच्याशी झाला. सुरवातीला शाब्दिक वादाचे नंतर भांडणात रुपांतर झाले. त्याचाच राग मनात धरून चार ते पाच जनांनी मुंडे याला मारहाण करण्यात सुरवात केली. भांडणात त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.
त्यानंतर सौरभ मुंडे यानी दिलेल्या तक्रारीवरून भिमराव पाटील, प्रदीप थोरात, रमा पाटील व त्यांच्या साथीदाराविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
- राशीद खान दुबईत करतोय मजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते…
- पहिल्याच दिवशी राधेचा धमाका ; दुबईत थिएटरबाहेर रांगा, तर…
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज मिळणार पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

