🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा झाली. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पुन्हा ट्रोल करण्यात आलं. दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले. शुभमन गिल, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली. पण शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल याला टीममध्ये संधी मिळाली नाही, त्यामुळे केएल राहुलचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करायला सुरूवात केली.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामिगिरी केली. यामुळे टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले होते. या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मोहम्मद सिराजला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही केएल राहुलला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे केएल राहुलचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करायला सुरूवात केली.
‘जोपर्यंत रवी शास्त्री भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत, तोपर्यंत केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची कारकीर्द सेट होणार नाही, असे आरोप ट्रोलर्सनी केले. तसंच अनेकांनी केएल राहुलऐवजी हनुमा विहारीला संधी देण्याबाबतही आक्षेप घेतले.’
अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या
- ज्या ज्या वेळी काँग्रेस सत्तेत येते त्यावेळी धर्मांतरण वाढते : आचार्य तुषार भोसले
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, कुणावरही जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- अखेर मनसे पुढे अॅमेझॉन झुकलं; मराठीचा भाषेचा लवकरच देणार पर्याय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
