🕒 1 min read
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.
आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. अर्नबवर केलेली कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. असे आरोप विरोधी पक्ष करत आहेत. अशात भाजपचे नेते किरीट सोमय्या हे अलिबागला अर्नब गोस्वामी यांना भेटायला गेला होते मात्र त्यांना भेटता आलं नाही. त्यानंतर मी अर्णव गोस्वामींना भेटण्यासाठी गेलो होतो, मात्र पोलिसांनी भेटू दिले नाही, ही सरकार आणि पोलिसांची दडपशाही आहे, याचा मी निषेध करतो. अस प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला, देवासमान आई हिरावून नेली, अशा कुटुंबाला न्याय मिळवून देणार’
- जो बायडन हे निवडणूक हरले आहेत, पण ते पराभव स्वीकारत नाहीत : डोनाल्ड ट्रंप
- केदारनाथ मंदिराला बर्फाची शाल ! पहा नेत्रदीपक फोटो
- याला राजकारण ऐसे नाव ! तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार ?
- आयपीएल नंतर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा देखील होणार यूएईमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
