मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवक आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले केशव उपाध्ये ?
उद्धव ठाकरे, आज शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का?, असा खोचक सवाल करत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का?.
लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला https://t.co/GFOi83FFzS
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 5, 2022
लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?
अडीच वर्षांत तुम्ही महाराष्ट्रासाठी केलेली किमान दहा कामे दाखवू शकाल का? ज्यामुळे तुमच्या सत्तेचा जनतेला थेट फायदा झाला?, असा थेट सवाल उपाध्ये यांनी ठाकरेंना केला आहे. त्याचबरोबर पुढे त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे की, लाकुडतोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण?. आता शरद उपाध्ये यांनी केलेल्या टीकेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आज @OfficeofUT आपण, शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का?- 1/6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 5, 2022
देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
तसेच, दोन दसरा मेळावे होत असल्यामुळे गर्दीचे प्रमाण देखील खूप असेल, अशावेळी शिवसेनेतील दोन गटांमध्ये शांततेचं वातावरण राहिल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार असल्याने मुंबईतल्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या काळात समाज कंटकांनी स्थिती अस्थिर करू नये, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.
तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का? 5/6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 5, 2022
अडीच वर्षांत तुम्ही महाराष्ट्रासाठी केलेली किमान दहा कामे दाखवू शकाल का? ज्यामुळे तुमच्या सत्तेचा जनतेला थेट फायदा झाला? 6/6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 5, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Jasprit Bumrah । टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर बुमराहनं मौन सोडलं; हृदय जिंकणारा संदेश शेअर केला
- Shivsena । आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
- Shivsena । दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या
- Weight Loss Tips | दररोज ‘ही’ योगासने केल्यामुळे होऊ शकते पोटावरील चरबी कमी
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी


