Karnataka Govt | सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही.
सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
कर्नाटक सरकारने (Karnataka Govt) जतच्या 40 गावांवर दावा केला होता. अशातच त्यांनी आता जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलंय. कर्नाटक सरकारने जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडलंय. जतच्या नागरिकांनी पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने थेट जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने आता नवीन वाद निर्माण झालाय.
जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणीपाठोपाठ सिद्धनाथ गावातले गावकरी आक्रमक झाले आहेत. 42 गावांमध्ये पाणी द्या अशी प्रमुख मागणी हे करत आहेत. त्यातच आता कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना “आमची बाजू संवैधानिक आणि कायदेशीर आहे”, असं मत बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “…हे षडयंत्र कुठून होतं?”, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला खोचक सवाल
- Sadabhau Khot | “राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद”वरुन वाद; सदाभाऊ यांचं स्पष्टीकरण
- Gujarat Assembly Elections 2022 | मतदानाचा पहिला टप्पा संपला, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान
- Sanjay Raut | बेळगाव न्यायालयाकडून संजय राऊतांना नवीन तारीख, ‘या’ तारखेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- Sanjay Gaikwad | “चंद्रकांत खैरे पिसाळला आहे” ; संजय गायकवाड यांचा जोरदार पलटवार


