🕒 1 min read
पुणे : सध्या राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे.केंद्र सरकारने लादलेले काळे कृषी कायदे मागे घ्या. या मागणीसाठी लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला कांग्रेससह महाराष्ट्रातील विवध पक्षांनी व विविध नेत्यांनी आपला पाठींबा दिला आहे.
दरम्यान, कंगना राणावत प्रकरण असेल,अर्णव गोस्वामी प्रकरण असेल,अशा इतरवेळी घसा फाडून फाडून ओरडणारे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या आंदोलनावर गप्प का आहेत. असा सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते कपिल ढोके यांनी केला आहे.
कंगना आणि अर्णव च्या वेळी घसा फाडून फाडून ओरडणारे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या आंदोलनावर का बोलत नाहीत ?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला शत्रू ओळखावा..!!@Dev_Fadnavis @TV9Marathi @SarkarnamaNews
— Kapil Dhoke (@KapilDhoke3) December 4, 2020
कपिल ढोके ह्यांनी ट्विटर वरून देवेंद्र फडणवीसांना हा सवाल विचारला आहे. महराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता आपला शत्रू ओळखला पाहिजे. ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही त्यांना ह्या पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी माफ करू नये अशी टीका या वेळी कपिल ढोके यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे मानले आभार
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
‘हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक’
- ‘हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रू काढणे फक्त पवारच सांगू शकतात’, भाजपचा ठाकरे सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

