मुंबई : देशात आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील समजला जातो. याच एका मुद्द्यावरून सरकारं पडतात आणि पुन्हा नव्यानं स्थापनही केली जातात. जिथे देशभरात आरक्षण मुद्द्यांवरून वाद विवाद चालू असून, कंगणा आता आरक्षण मुद्द्याकडे वळाली नुकतेच कंगणाने आरक्षण बाबत ट्विट करून आपले मत मांडले आहे.
आरक्षण देण्यासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. जातीच्या आधारे आरक्षण द्यावे की माणसाची आर्थिक स्थिती लक्षात घेता आरक्षण द्यावे? या महत्त्वाच्या विषयावर आता कंगणा राणौतनं आपलं मत मांडले आहे.
कंगणाने आरक्षणाची खरी गरज कोणाला आहे व आरक्षण कोणाला दिले गेले पाहिजे यावर ट्विट केले, “देशामध्ये आरक्षण कास्ट सिस्टमवर आधारित नसून गरिबांसाठी असले पाहिजे … मला माहित आहे की राजपूत कसे दु: ख भोगत आहेत पण ब्राह्मणांबद्दल वाचून खूप वाईट वाटले”
https://twitter.com/KanganaTeam/status/1319982423673769985
याचदरम्यान अभिनेत्री कंगना रानौत हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शनिवारी सकाळी एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वडिलांची तत्त्वे विसरले आहेत. रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या मुद्यावरुन पत्रकारांवर अत्याचार करणा-या अशा सरकारचा धिक्कार असो, असे कंगना म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- बोले तैसा चाले … : फडणवीस सरकारी रुग्णालयातच घेताहेत कोरोनावरील उपचार
- लोकं काही सुधारेनात : मास्क न लावणाऱ्या लोकांकडून कोट्यावधी रुपयांची दंड वसुली
- कांद्याच्या दरात वाढ : बफर साठ्यातून कांदा आणण्याला सरकारकडून गती
- खडसे साहेब शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं तुमची ताकद दाखवा – प्रवीण दरेकर
- ‘कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’ ; मुख्यमंत्र्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

