🕒 1 min read
यवतमाळ : शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून पीकपेरा नोंदवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पण ही प्रक्रिया किचकट ठरत असून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे. ई-पीक पाहणीत विविध स्वरूपातील अडचणी निर्माण झाल्यात. त्या तत्काळ दूर करण्यात याव्यात, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी कृषी विभागाला दिले आहे.
वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे आजही स्मार्ट फोन नाहीत. ग्रामीण भागात पुरेशा गतीने मोबाईल नेटवर्क मिळत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाईल हाताळताही येत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी प्रक्रियेचा बोजवारा उडवायचा नसेल तर शासनाने प्रत्येक गावाची जबाबदारी त्या-त्या गावच्या कृषी सहायकावर निश्चित करायला हवी. शासनाने सर्व जबाबदारी शेतक-यांवर दिल्याने त्रुटी राहण्याची शक्यता अधिक असून त्याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात तसेच तलाठी व कृषी सहाय्यकांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश खा. गवळी यांनी दिले आहे.
दरम्यान, पीक पेरा ई-पीक नोंदणीद्वारे करण्याचे सरकारने आदेश काढल्याने शेतकरी अडचणीत सापडलेत. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे तक्रार करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांना मोबाइल हाताळता येत नसल्याने ते वैतागले आहे. त्यामुळे शेतकरी अनेक योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने खा. गवळी यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना ई पीक पाहणी अॅपमधील अडचणी दुर करण्याचे निर्देश दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने निवडणुका रोखून दाखवाव्यात’, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे यांचे आव्हान
- ‘बाबासाहेबांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी जिवंत राहिली तरच दीन दुबळ्यांना न्याय मिळेल’
- गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना परवानगी, राज्य शासनाचे आदेश
- ‘..आता कोथळा काढायची भाषा केली जाते!’, शरद पवारांचे महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर भाष्य
- ‘महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटी दर हळूहळू वाढत आहे’, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
