Share

ओबीसींची वज्रमुठ होण्यासाठी चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हा! भाजप शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकरांचे आवाहन

Published On: 

औरंगाबाद : सध्या राज्यात आरक्षणाचे वारे सुसाट वाहू लागले आहे. मराठा तसेच ओबीसींच्या आरक्षणाने सध्या जोर धरला आहे. दि. २६ रोजी भाजपच्या वतीने उग्र चक्का जाम आंदोलन आकाशवाणी चौकात करण्यात येणार आहे. यासाठी ओबीसीसमाज बांधवांसह भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन भाजप शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्या विरोधात ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरत, पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आता यात भाजपने दि. २६ रोजी आकाशवाणी चौकात चक्का जाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, या आंदोलनात ओबीसी समाज बांधवांसह भाजप कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन संजय केनेकरांनी केले आहे. सध्या भाजप सत्ताधाऱ्यांना आरक्षणाच्या कचाट्यात पकडण्याची एकही संधी सोडत नसताना, शनिवारी होणाऱ्या आंदोलनाचे किती पडसाद पडतात या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!