मुंबई: चीनने आक्रमण केल्याचं पंतप्रधान मानायला तयार नाहीत. सीमेवर २० सैनिक मारले जाणं हे कमी नाही. १९६७ नंतर आजवर एकाही भारतीय सैनिकाला चीनच्या सीमेवर प्राण गमवावे लागलेले नाहीत. सर्वांनी हात वरकरून चालणार नाही, कोणी तरी जबाबदारी स्वीकारावी लागेल, असं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
जाणून घ्या रेल्वेने चीनी कंपन्यांचे कंत्राट सीमेवरील परिस्थितीमुळे खरंच रद्द केले का ?
गलवान भागामध्ये चीनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्यात २० भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर तणावाचे वातारणात असतानाच देशांतर्गत राजकारण देखील तापताना दिसत आहे.
उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करण्याचे संजय राउताचे स्वप्न? मग शरदचंद्र पवारांचे काय ?
सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेऊन आम्ही सार्वजन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत. चीन सीमेवर घडणाऱ्या घटनेवर सीमाभागात काहीच झालं नाही, असं म्हणून कसं चालेल, सर्व भारतीयांच्या मनात हा प्रश्न आहे. याचं उत्तर लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी द्यायला हवं, असंही आव्हाड म्हणाले आहेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

