🕒 1 min read
मुंबई : रविवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अजित पवार निघून गेले. त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. वक्ता म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच अजित पवार मंचावरून निघून गेले. आता नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यापूर्वी अजित पवारांनी बंडखोर वृत्ती दाखवली आहे. जयंत पाटील यांच्यानंतर अजित पवार बोलणार होते, मात्र ते परतले नाहीत. अशातच व्यासपीठावर शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांची ही भूमिका मोठे आव्हान म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे पक्षात फूट पडण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते हसले आणि म्हणाले… तेव्हा अजित पवार फ्रेश होण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे वेळेअभावी त्यांना बोलता आलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
नेमकं यावेळी काय झालं होत?
शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील, असे पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. पण तो स्टेजवरून अशा रीतीने उठले की परत आलेचं नाहीत. अजित पवार वॉशरूममध्ये असल्याचे मंचावरूनच सांगण्यात आले. मात्र उशिरापर्यंत ते आले नाहीत आणि ते परतले तेव्हाही शरद पवार यांचे समारोपाचे भाषण सुरू होते. अजित पवार मंचावरून उठताच त्यांच्या समर्थकांनीही घोषणाबाजी केली. त्यांच्या या भूमिकेकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. नाराज अजित पवारांचे मन वळवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्या चुलत बहिण सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अजित पवारांची ही भूमिका राष्ट्रवादीला तणावात टाकणारी आहे, कारण त्यांनी यापूर्वी बंडखोरी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथही घेतली आहे. दोघांनीही सकाळीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण 80 तासही सरकार चालू शकले नाही. आजही त्यांचे फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्याचे बोलले जाते.
महत्वाच्या बातम्या :
- Bhaskar Jadhav | “…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील”
- Raj Thackeray | “होय! विदर्भाकडे माझं दुर्लक्ष झालं, मात्र…”, राज ठाकरेंनी दिली कबुली
- Sharad Pawar । शिंदे साहेबांनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- Bhaskar Jadhav | “मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी…” भास्कर जाधवांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Raj Thackeray | “वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा? त्याची चौकशी करा”, विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची प्रतिक्रीया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
