🕒 1 min read
बीड: एप्रिल महिन्याच्या २५ तारखेला केज-कळंब रस्त्यावर जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला करून तिचा निर्घुण खून केला असल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी जावाई फरार होता. पत्नीला नांदायला पाठवण्यावरून हा वाद झाला होता आणि अखेर जावयाने सासूचा खून केला होता. त्यानंतर जावाई तेथून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्या जावयाला तब्बल २२ दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
साळेगाव येथील अमोल वैजनाथ इंगळे याने पत्नीस नांदण्यास का पाठवले नाही या रागातून भेटण्यासाठी आलेल्या धायगुडा पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथील सासू लोचना धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश धायगुडे यांच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने हल्ला केल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान केज-कळंब रस्त्यावरील संताजी हॉटेलजवळ घडली होती. या हल्ल्यात सासू लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पुतण्या अंकुश धायगुडे जखमी झाला होता.
या घटनेनंतर अमोल इंगळे हा फरार झाला होता. तर त्याच्यासोबत असलेला त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत बबन इंगळे याला पोलिसांनी अटक केली होती. अमोल इंगळे हा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे नातेवाईकांकडे शेतात असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनात पथकाने १८ मे रोजी सकाळी ७ वाजता सापळा रचून अमोल इंगळे झोपेत असतानाच त्याला अटक केली.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात कोरोनाच्या भीतीने लसीकरणाला गर्दी; सोशल डिस्टन्सिंग मात्र पायदळी
- आमच्या कोकणातही प्रचंड नुकसान झाले आहे मग मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर का येत नाहीत?
- अमृता फडणवीस आणि चाकणकरांमध्ये ट्विटवॉर, ‘शेरनी’चे शेर एकमेकींकडून शेअर
- जालन्यातील ‘हे’ गाव ठरतंय कोरोनाचे हॉटस्पॉट!
- विनाकारण फिरणाऱ्याला होणार 500 रूपये दंड, वापरलेले वाहनही पोलीस घेणार ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
