Share

‘राजकीय लोकांची नाटकं सुरु मात्र रंगभूमीवरील नाटकांना मनाई’; केदारने साधला राज्य सरकारवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. तसेच सर्वसामान्याप्रमाणेच मनोरंज क्षेत्राला देखील कोरोनाचा फटका बसल आहे. यातच रंगभूमीवरील नाटकही बंद आहेत. याच बाबत केदार शिंदे यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे.

लोकांसाठी तरी नाटकं सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत निर्माते केदार शिंदे  ट्विट करत म्हणाले की, ‘राजकीय लोकांची जोरदार नाटकं सुरू असताना झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो. पण रंगभूमीवर आमच्या नाटकांना मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई…’, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

तर पुढे आणखी एक ट्विट करत ते म्हणाले, ‘याठिकाणी आणि त्याठिकाणी… एवढच म्हणत, सामान्य माणसाला या राजकीय नेत्यांनी जिथल्या तिथेच ठेवण्याचा चंग बांधला आहे… टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सामने पहाणारे परदेशी प्रेक्षक मास्क शिवाय पाहीले की, वाटतं कोरोनासाठी आपली तोंड बंद केली आहेत की, आपल्याला बोलूच द्यायाचं नाही आहे?’, असे ट्विट करत केदार शिंदे यांनी रंगभूमी पुन्हा एकदा सुरु करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या ट्विटकडे  अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!