🕒 1 min read
औरंगाबाद : सामान्य नागरिकांमधून व्यक्त होणारा तीव्र रोष, लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून होणाऱ्या विरोधामुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून औरंगाबादेत लागू होणाऱ्या कडक लॉकडाऊनचा निर्णय मंगळवारी रात्री मागे घेतला. मात्र या निर्णयानंतर जलील
यांना खांद्यावर घेत त्यांच्या घरासमोरुन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. यात जलील यांच्यासह सर्व कार्यकर्ते विनामास्क होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवत हि मिरवणूक थाटात निघाली.
औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने काल राञी घेतला होता. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. खासदार जलील यांच्या या कृतीवर राज्यभरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर खासदार जलील यांनी चूक झाल्याची कबूली दिली आहे. जलील म्हणाले, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. पण, नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.
जलील पुढे म्हणाले आहे की, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायदा आहे त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना प्रतिबंधासाठी दररोज १० हजार चाचण्या
- एक माजी मुख्यमंत्री व एक माजी पोलीस आयुक्त, त्यांना FIR प्रोसिजर माहीत नव्हती? राष्ट्रवादीची टीका
- पुणे महापालिकेचे ‘कोरोना कॉल सेंटर’ आता २४ तास उपलब्ध राहणार
- जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी 30 हजार पानांची याचिका
- रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, चर्चांना उधाण


