🕒 1 min read
रायपूर : दिवाळीच्या आधी जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. या पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत होती. पेट्रोलच्या दराने चक्क शंभरी पार केली होती. केंद्रावर सर्वसामान्य चांगलेच संतापले. त्यावरुन केंद्राने दिवाळीच्या दिवशी एक्साईज टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये 5 आणि 7 रुपये अशी किंमती कमी झाल्या.
केंद्राने केलेल्या दर कपाती वरुनही विरोधकांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रातील वरीष्ठ नेत्यांनंतर आता काँग्रेसशासित राज्य सरकारकांकडून या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पेट्रोल-डिधेल दरकपातीवरून निशाणा साधला आहे.
केंद्रानं घेतलेला हा निर्णय म्हणजे फक्त लॉलिपॉपच की. ‘जर एनडीए सरकारने यूपीए सरकारप्रमाणेच एक्साईज ड्युटी ३० रुपयांवरून ९ रुपयांपर्यंत कमी केली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नक्कीच कमी होतील. पण ३० रुपयांनी आधी पेट्रोल वाढवायचं आणि त्यानंतर ते ५ रुपयांनी कमी करणं हे फक्त एक लॉलिपॉप आहे’, असं भूपेश बघेल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री माझ्या कानात एक वाक्य बोलले तेव्हाच ठरवलं आता भांडाफोड करायचाच’
- अनिल देशमुखांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज करणार; वकिलांनी दिली माहिती
- कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ
- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’

