Share

‘आमच्यासाठी पुनरागमन करणे अवघड पण..,’ न्यूझीलंडच्या खेळाडूचे विधान

Published On: 

मुंबई : मुंबई कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्धच्या मुंबई कसोटी (IND vs NZ) सामन्यात पुनरागमन करणे कठीण असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू. असं भाष्य रचिन रवींद्र याने केलं आहे.

भारताकडून मिळालेल्या 540 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने आत्तापर्यंत  6गड्यांच्या मोबदल्यात 162धावा केल्या असून सामन्याला अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रवींद्र म्हणाला की, 60 धावांवर बाद होणे नेहमीच अवघड असते, अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या. ही आमची सर्वोत्तम कामगिरी नव्हती पण आम्हाला माहित होते की आम्हाला दुसरा डाव मिळाला की आम्ही तेथून लढत राहू.

दुस-या डावात भारताच्या 3 विकेट्सबद्दल रवींद्र म्हणाला की, या खेळासाठी तुम्ही जे काही केले त्यावरून शिकून पुढच्या गोष्टीकडे जाणे महत्त्वाचे आहे, जे घडले त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक नाही.

चौथ्या दिवशी रवींद्र फिरकीला पूर्णपणे अनुकूल अशा खेळपट्टीवर फलंदाजी करेल. किवी संघाकडे अजून 4विकेट शिल्लक आहेत पण सामना भारतीय संघाच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडच्या संघाला सामना जिंकण्यासाठी मोठ्या धावसंख्येचे लक्ष पार करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!