🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केली आहे. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
यावरून राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून ईडीच्या कारवाईच्या भाजप नेत्यांनी स्वागत केले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ईडी चौकशीमुळे दूध का दूध आणि पानीका पानी होईल, असा टोला देखील लगावला आहे. ‘अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी,’ अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युवराज आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले’
- जगभरात गाजतोय निलेश लंकेचा डंका; परदेशातून मिळतेय कोविड सेंटरला मदत
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- जालनावासियांची होणार खड्ड्यांतून मुक्तता, रस्त्यांसाठी ५ कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर
- केवीन पीटरसनने केले हिंदीमध्ये ट्विट ; चाहते म्हणाले, ‘इमोशनल कर दिया यार’


