Share

राज्याचे मुख्यमंत्री घरी आहेत हे मान्य पण गृहमंत्री आहेत की नाही?- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपूर्वी पिंपळेगुरव परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. असे असतांनाच पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून ११ वीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.’ तसेच राज्याचे मुख्यमंत्री घरी आहेत हे मान्य पण गृहमंत्री आहेत की नाही? वसूली करण्यापलीकडेही आपली कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना आहे काय?, असा सवालही भातखळकरांनी केला आहे.

दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव दशांत परदेशी असून तो १७ वर्षांचा होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल(२२ डिसें.) संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान दशांत घराबाहेर पडला. परंतु तो रात्रीपर्यंत घरी पोहोचलाच नाही, त्यामुळे दशांतच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. शोध सुरु असतांनाच एका बंद पडलेल्या कंपनीसमोर दशांत मृतावस्थेत आढळला. तद्पश्चात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!