Share

‘कुणीही सीबीआय चौकशीची मागणी केल्याने ती होत नसते’, गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कुणीही सीबीआय चौकशीची मागणी केल्याने ती होत नसते, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांच्या चौकशीवरून शुक्रवारी लगावला. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अधिकारी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी कारवाईबाबत मी अधिक बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहेत. पण चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सध्या सर्वांचे लक्ष कोरोनाच्या उपाययोजनांकडे असले पाहिजे. परंतू, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे.

विरोधी पक्षनेतेे देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर वळसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात सध्या कोरोनाचे संकट फोफावले असताना फडणवीस राजकारण करू पाहत आहेत. तसेच, मागील एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!