Share

इशानच्या उत्तम कामगिरीमुळे सिनिअर खेळाडूची जागा धोक्यात?

Published On: 

अहमदाबाद : कॅप्टन विराट कोहली आणि पहिलीच मॅच खेळणारा इशान किशन यांच्या अर्धशतकामुळे भारतानं टी20 मालिकेत जोरदार पुनरागमन केलं आहे. भारताने दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचा 7 विकेटने पराभव करत पाच मॅचच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ७ गडी राखुन पराभव केला. या सामन्यातील सामनावीर इशान किशनचे सगळीकडे कौतुक होत आहे. किशनच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवीण्यात आले.

भारतीय टीमनं या मॅचमध्ये प्रयोग करत शिखर धवनच्या जागी इशानला संधी दिली. शिखरला पहिल्या मॅचमध्ये खास कामगिरी करता आली नव्हती. तो 12 बॉलमध्ये फक्त 4 रन काढून आऊट झाला. विराटने या मालिकेच्या पूर्वी रोहित शर्मा आणि केएल राहुल हे पहिल्या पसंतीचे सलामीवीर आहेत, असं सांगितले होतं. रोहितला विश्रांती दिल्यानेच धवनला पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली. मात्र त्यामध्ये तो अपयशी ठरल्यानं त्याला टीमममधून वगळण्यात आलं.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशन सध्या फक्त 22 वर्षांचा आहे. भारतीय टीममध्ये तो शिखरच्या ऐवजी सलामीचा दावेदार बनू शकतो. इशान देखील धवन प्रमाणे डाव्या हाताने बॅटींग करतो. मोठे फटके लगावण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याने मागच्या आयपीएल सिझनमध्ये  14 मॅचमध्ये 516 रन केले होते. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश होता. इशानच्या या साऱ्या विशेष गोष्टींचा थेट परिणाम हा शिखर धवनवर होणार आहे. त्यामुळे त्याची भारतीय टीममधील आधीच डळमळीत असलेली जागा आता धोक्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!