🕒 1 min read
औरंगाबाद : सध्या कोरोनाचे रुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहे. प्रशासन आप-आपल्या परीने उपाय योजना राबवत आहे. परंतु या उपाय योजनेला सध्या हरताळ फासले जात असल्याचे चित्र जाधववाडी मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे १४ मार्च पर्यंत जमावबंदी वाढवण्यात आलेली आहे. परंतु हि जमावबंदी जाधववाडीला लागू नाही का ? असा सवाल नागरिक करत आहे.
शहरात कोरोनाने गेल्या काही दिवसात थैमान घातले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. काही नागरिक कोरोना गंभीरतेने घेत नसल्याने शहरात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील जाधववाडी भागात भरणाऱ्या भाजी मंडई मुळे अक्षरशः गर्दीचे लोंढे दिसत आहे. पोलीस यंत्रणा आपल्यापरीने गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, शहरात लागू असलेल्या जमावबंदीचा आदेश जाधववाडी मध्ये लागू आहे का असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्या पासून पुन्हा रुग्णांनी शंभरी गाठण्यास सुरुवात केली. १९ रोजी १४३, २० रोजी १२६, २१ रोजी १८४, २२ रोजी १०४, २३ रोजी २१९, २४ रोजी २८१, २५ रोजी २७५, २६ रोजी २४७, २७ रोजी २९७, २८ रोजी २५६, १ मार्च रोजी २२५ तर काल ३२५ बाधित रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे. मात्र, मागच्या वर्षाच्या तुलनेत काही नागरिकात जास्त गंभीरता दिसून येत नाही, त्यामुळे नियम पाळण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे भाजप आ.राणा पाटील नाराज, मंत्री अमित देशमुखांना लिहिले पत्र
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
