मुंबई: आयपीएलचा १५वा सीझन मुंबई इंडियन्ससाठी भयावह स्वप्नापेक्षा कमी दिसत नाहीये. ज्या संघाने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, त्यांना अद्याप IPL 2022 लीगचा एकही सामना जिंकता आलेला नाहीये. मुंबईला यंदा सहावेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक झहीर खानने या संबधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
झहीर खान (Zaheer khan) म्हणाला, “हा एक खेळ आहे संघातील सर्व खेळाडूंनी योगदान देण्याचा आहे. म्हणून आम्हाला एकत्र राहावे लागेल, एकत्र येण्याचे मार्ग शोधावे लागतील आणि नंतर एक शक्ती बनावे लागेल. प्रत्येक हंगामात आव्हाने असतात, तिथे दबावही असतो. त्यामुळे त्यांना सामोरे जाण्यासाठी पूर्ण तोडगा काढावा लागेल. ब्रेव्हिसच्या खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तो चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, त्याने आतापर्यंत चांगली खेळी खेळली आहे.”
प्रशिक्षक झहीरने खेळाडूंच्या मनोधैर्यावर आपले वक्तव्य केले आहे. “खेळाडू गोष्टी बदलण्यास उत्सुक असतात आणि आम्हाला फक्त त्यांना समर्थन द्यावे लागेल. सातत्यपूर्ण पराभवामुळे खेळाडूंचे मनोधैर्य खचते. आम्हाला फक्त एक विजयाची गरज आहे, जिथे लोक आशा करत आहेत की हा विजय मुंबईला कायम ठेवेल. खेळाडूंनी निराश होऊ नये. विजय – पराभवाचा खेळ सुरूच असतो, पण आता त्यांचे मनोबल वाढवण्याची वेळ आली आहे.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंनी नक्की कोणत्या प्रकारचं हिंदुत्व स्वीकारलं? – संजय राऊत
- IPL 2022 : सुनील नरिनचे निवृत्तीचे संकेत? मुलाखतीत म्हणाला, “मला माझं करियर…”
- “धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय” ; भोंग्यांच्या मुद्द्यावर प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली खंत
- IPL 2022 : हे काय..! स्पर्धेच्या मध्यात ‘CANCEL IPL’ होतोय ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय आहे कारण
- IPL 2022 RR vs KKR : कोलकातानं जिंकला टॉस; राजस्थानकडून ‘या’ खेळाडूचं पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!


