🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये प्लेऑफचे चार संघ निश्चित झालेले असताना सहा संघांचे आव्हान संपलेले आहे. यंदाच्या हंगामातील ७०वा सामना पंजाब आणि हैदराबाद यांच्यात आज अखेरचा साखळी सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ एकमेकांमधील क्रमवारी निश्चित करेल, एवढेच महत्त्व या सामन्याला असणार आहे.
स्पर्धेच्या प्लेऑफ,आधील संघ निश्चित झालेले असताना शिल्लक राहिलेल्या अखेरच्या सामन्याला डेड रबर असे म्हटले जाते. आजचा हा सामना त्याच धर्तीचा आहे. विजय मिळवून यंदाच्या मोसमाची विजयाने सांगता करणे, हेच उद्दिष्ट उद्या दोन्ही संघांसमोर असणार आहे.
अखेरचा सामना असल्यामुळे दोन्ही संघातील राखीव खेळाडूंना उद्या संधी दिली जाऊ शकते. हैदराबादला तर नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर केन विल्यमसन मायदेशी रवाना झाला होता. निकोलस पुरन हा त्यांचा नवा कर्णधार असू शकेल. पोलार्डने निवृत्ती जाहीर केल्यामुळे वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदी पूरनची निवड झालेली आहे.
A final ROAR from our ????s ahead of #SRHvPBKS ????#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @mayankcricket @RajangadBawa @thisisbrar pic.twitter.com/kDUASSnY4B
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 22, 2022
Adding finesse to our final training session ????#OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/WYepZVs4kw
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 21, 2022
शेवटच्या औपचारिक सामन्यात पंजाब संघातही कर्णधार बदल अपेक्षित आहे. एरवी सलामीला खेळणारा मयांक अगरवाल फॉर्मात नसल्यामुळे शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आयपीएल २०२२ गुणतालिकेत दोन्हीही संघ ७ आणि ८ व्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
