🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये प्लेऑफ खेळण्यासाठी चार संघ निश्चित झाले आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा ५ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर दिल्लीचे प्लेऑफ खेळण्याचे स्वप्न भंगले, तर त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलग तिसऱ्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला. वानखेडे स्टेडियमवर १६० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला शेवटच्या ३१ चेंडूत ६५ धावांची गरज होती. यानंतर टिम डेव्हिडने सामना पूर्णपणे बदलला. डेव्हिडने अवघ्या ११ चेंडूत ३४ धावांची धडाकेबाज खेळी केली.
डेव्हिडने सामन्यानंतर खुलासा केला, की या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने त्याला सकाळीच मेसेज केला होता. तो म्हणाला, ”आज सकाळी फाफने मला मेसेजही केला होता. ज्यामध्ये विराट, मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबई इंडियन्सचे टी-शर्ट घातले होते. विजयासह समाप्त करणे चांगले वाटते. चांगली भावना आहे. विजयासह पूर्ण करण्यापेक्षा आम्ही काहीही मागू शकत नाही. इशान आऊट होताच त्याने मला सांगितले, की विकेट सपाट आणि संथ झाली आहे, चेंडू उशिराने बॅटवर येत आहेत.”
Faf du Plessis Glenn Maxwell and Virat Kohli will play for Mumbai Indians today.????????❤️ pic.twitter.com/oJT8uaKEFx
— Mashrafi Mahi Bro (@brommahi2003) May 21, 2022
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने टिम डेव्हिडविरुद्ध झेलच्या अपीलसाठी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता, तर निकाल वेगळा लागला असता, कारण मुंबईकडे तेवढी फलंदाजी उरलेली नव्हती. दिल्लीच्या पराभवाचे हेही एक प्रमुख कारण होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
