🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. पुण्यात खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने ८३ धावांत ४ विकेट गमावल्या. रिंकू सिंह सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आली. पण तोही मोठी खेळी करू शकला नाही आणि ६ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. त्याच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
टी. नटराजन हैदराबादसाठी डावातील १२वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नटराजनने यॉर्कर टाकला, जो थेट रिंकू सिंगच्या पायात गेला. यानंतर नटराजन आणि हैदराबादच्या उर्वरित खेळाडूंनी पायचीतचे अपील केले. अंपायरने थोड्या वेळाने बाद असा निर्णय दिला. पंचांच्या या निर्णयाने रिंकू थक्क झाला. यानंतर नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या सॅम बिलिंग्सने रिव्ह्यूचे संकेत दिले. पण पंचांनी ते मान्य केले नाही. कारण नियमानुसार, बाद होणारा फलंदाज केवळ डीआरएसकडे अपील करू शकतो.
Has Rinku Singh done a blunder as he forgot to signal 'T' for DRS and umpires asked him to walk.https://t.co/tMZmJ5YMlO
— CricTracker (@Cricketracker) May 14, 2022
रिंकू सिंहने डीआरएस मागितला तोपर्यंत १५ सेकंदांची मुदत संपली होती. अशा परिस्थितीत मैदानावरील पंचांनी त्याला डीआरएस घेऊ दिला नाही. यानंतरही रिंकू मैदानावरच राहिला. तो पॅव्हेलियनमध्ये परतण्यास तयार नव्हता. पंचांनी रिंकूला अनेक वेळा समजावून सांगितले. त्यानंतर तो मैदानातून डग आऊटच्या दिशेने परतला. यादरम्यान केकेआरचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमनेही चौथ्या पंचांशी संवाद साधला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
