🕒 1 min read
मुंबई: आयपीएल स्पर्धा कोणत्या तारखेपासून सुरु होणार याची घोषणा झाल्यानंतर आता सामन्यांची वाटणी कशी होणार हे देखील जाहीर झाले आहे. यंदाच्या हंगामापासून स्पर्धेत १० संघ असणार आहे. यामुळेच आता आयपीएल मध्ये या १० संघाना दोन गटात वाटले गेले आहे. जेणेकरून सामने कसे खेळवले जाणार हे समजण्यास सोपे होईल.
आयपीएल मधील हे दहा संघ पाच-पाच असे ए आणि बी गटात वाटले गेले आहेत. ए गटात मुंबई इंडियन्स (MI), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि ब गटात – चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS) आणि गुजरात टायटन्स हे असणार आहेत. हे गट कोणी किती विजेतेपद मिळवले यावर आधारित आहे.
The group Ensemble! ????! Aaramikalangala?!#TATAIPL #WhistlePodu ???? pic.twitter.com/LfKVYKtpFR
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 25, 2022
आयपीएलसाठी तयार केलेल्या या गट रचनेत धोनीचे CSK आणि विराटचा RCB गट बी मध्ये एकत्र आले आहेत. याचा अर्थ CSK विरुद्ध RCB यांचा या मौसमात दोनदा सामना होणार आहे. “प्रत्येक संघ त्यांच्या गटातील संघांसह आणि दुसऱ्या गटातील एकाच रांगेतील संघासह दोनदा खेळेल. दुसऱ्या गटातील उर्वरित संघांसह ते हंगामात फक्त एकदाच खेळतील. असे बीसीसीआयच्या निवेदनात लिहण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- युक्रेन-रशिया युद्धात चीनची उडी; शी जिनपिंग पुतीन यांना फोन करत म्हणाले…
- ‘तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड संबंधी आराखडा तयार करण्याचे निर्देश’ – राजेश टोपे
- भारताने एकतर्फी सामना जिंकला ; कर्णधार रोहित मात्र खेळांडूवर भडकला
- ‘भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडे पडण्याची भीती असल्यानेच…’ विखे पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
- रिद्धिमान साहा होऊ शकतो सस्पेंड; बीसीसीआय संघ निवडी विषयी आरोपांवर प्रश्न विचारणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
