मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. गुणतालिकेत गुजरात संघ अव्वल, तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांमध्ये होणार्या पहिल्या क्वालिफायर सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र हवामानामुळे चाहत्यांची तसेच बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे.
पश्चिम बंगालमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे अनेकजण संकटांना तोंड देत आहेत. कोलकातामध्येही वादळ आणि वादळासह मुसळधार पाऊस पडत आहे. आयपीएल प्लेऑफच्या आधी बदललेल्या हवामानामुळे ईडन गार्डन्सचे नुकसान झाले. शनिवारी मुसळधार पाऊस आणि वादळामुळे ईडन गार्डन्समध्ये मोठी हानी झाली.
Eden Gardens damaged after a thunderstorm #Kolkata #Edengardens pic.twitter.com/I2cXOXsCbS
— Akash Kharade (@cricaakash) May 22, 2022
वादळामुळे स्टेडियमच्या प्रेस बॉक्सचेही नुकसान झाले आहे. वादळाची तीव्रता इतकी होती की, स्टेडियमच्या मीडिया बॉक्सच्या समोरील खिडकीची काच फुटली. काही जाहिरातींचे होर्डिंगही तुटले आहेत. खराब हवामानामुळे सामन्यावर संकटाचे ढग दिसू लागले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सामन्यापूर्वी स्टेडियमला भेट दिली. गांगुलीने सामन्यापूर्वी सर्व सुरळित होईल. असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

