Share

IPL 2022 : आयपीएलचे सगळे सामने एकाच शहरात आयोजित करण्याचे बीसीसीआयचे नियोजन

Published On: 

मुंबई : कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे आयपीएलचे नियोजन पुन्हा भारतातच करण्याचे नियोजन बीसीसीआय करत आहे. ज्यात सगळे सामने मुंबईत खेळविण्यात येणार असल्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. आयपीएलचे नियोजन कुठे व्हावे यासाठी २० फेब्रुवारी पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या निगडित असलेल्या सूत्रांकडून महिती मिळत आहे की , कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झळ अनेक राज्यांना बसत आहे. त्यात महाराष्ट्रात याचे प्रमाण जरा कमी आहे. आयपीएलचे संपूर्ण नियोजन वेगवेगळ्या शहरात करणे अशा स्थितीत शक्य नसल्याने मुंबई आयोजनाच्या दृष्टीने योग्य ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील वानखेडे , ब्रेबोन आणि नवी मुंबईतील डीवाय पाटिल स्टेडियम सामन्यांसाठी शोर्टलिस्ट केले गेले आहे.

२०२० आणि २०२१ मध्ये आयपीएलचे आयोजन दुबईत करण्यात आले होते . मात्र बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच यावर्षीच्या स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. आयपीएल २०२२चा हंगाम २७ मार्च पासून सुरू होण्याची शक्यता आहे. याआधी फेब्रुवारी मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. तसेच यंदाच्या हंगामापासून अहमदाबाद आणि लखनऊ सुपर जाईंट्स या २ नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!