Share

पर्यटन स्थळे सुरू मात्र, व्यावसायिकांना आरटीपीसीआर बंधनकारक

Published On: 

औरंगाबाद : पर्यटकांना पर्यटनांचा आनंद घेता यावा, अनेक रोजगारांना मदत व्हावी, या उद्देशाने सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटन उद्योगातील व्यावसायिक, खेळणी विक्रेते, फूड स्टॉल विक्रेते, गाईड आदींनी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसांत करणे बंधनकारक आहे. असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जर या व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील; कोणतीही कोरोना आजारांची लक्षणे नसतील, अशांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्कता नाही. मात्र, त्यांनी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले.

पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असली तरी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. पर्यटन स्थळांबाबतच्या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटनांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग कायदा १८९७ अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेली पर्यटन स्थळे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी आधी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुखाचे आदेश अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद मधील सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!