पुणे : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.
याप्रकरणावरुन सध्या चर्चेत असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांवर सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत आहेत.
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांना छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अधिक काहीही न बोलता आगे आगे देखो होता है क्या? एवढंच उत्तर देणं पसंत केले आहे. तर दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे. ‘छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे.’ असे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भ्रष्टाचार करण्यासाठी या नेत्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का?; सोमय्यांचा शरद पवारांना कडवा सवाल
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- स्थानिक पातळ्यांवर अजूनही महाविकास आघाडीत बिघाडी? खुद्द अजित पवारच म्हणाले…
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

