Share

शिक्षक मंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला, ‘दार उघड बये, आतातरी दार उघड’!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. अनेकांचे शिक्षण बंद असल्यामुळे अनेक मुले शाळाबाह्य झाली आहेत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने कोविड नियमांचे पालन करतात शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी शेकाप प्रणित पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे ‘दार उघड बये आता दार उघड’ आंदोलन मंगळवारी (दि.१७) क्रांती चौकात करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बालमजुरीचे प्रमाणही वाढले आहेच. सोबतच अनेक मुलींचे बाल विवाहही लावून देण्यात आले आहेत. गरीब विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जात आहे. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत मत व्यक्त केले आहे. शाळा सुरू न झाल्यास मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होईल.

त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात. सध्या राज्यातील शहरांमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. आणि शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जात असलेल्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी कोरोना नियमांचे पालन सुरु करण्याचे निर्देश शासनाने द्यावे. अशी मागणी संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, संजय जाधव, भागवत शिंदे आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!