Share

निर्णायक लढतीत भारताचा विजय; मालिकेतील आव्हान कायम

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. १८५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजानी १७७ धावांत रोखले. या विजयामुळे भारताने ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. शनिवारी होणारा अंतिम सामना दोन्हा संघासाठी निर्णायक असणार आहे.

नाणेफेक हरल्यानंतर इंग्लंडच्या संघाने भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. रोहित-के.एल. राहुल दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सुर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी करत अर्धशतक झळकावले. सुर्यकुमार यादवने ३१ चेंडुत ५७ धावा केल्या. सुर्यकुमारच्या अर्धशतक आणि श्रेयस अय्यर-पंत यांच्या साहाय्याने भारताने इंग्लंडसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले.

दुसऱ्या डावात भारताने मागील सामन्यातील सामनावीर बटलरला स्वस्तात माघारी पाठवले. यानंतर जेसन रॉयने डाव सावरत ४० धावांची खेळी केली. रॉय बाद झाल्यानंतर बेन स्टाेक्सने संयमी खेळी करताना ४६ धावा काढल्या. तसेच बेयरस्ट्रोने २५ धावांची खेळी केली. यानंतर भारतीय गोलंदाजानी तिखट मारा करत इंग्लंडच्या संघाला १७७ धावांत रोखले. या विजयासह भारताने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. अर्धशतकी खेळीसाठी सुर्यकुमार यादवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवीण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!