Share

आज भारत-इंग्लंड दुसरा टी-२० सामना ; टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

अह्मदाबाद : कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंडसंघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करत पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाचे या सामन्यामध्ये दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल. पहिल्या सामन्याच्या खेळपट्टीवर नक्की काय केले पाहिजे हे आम्हाला कळले नाही, अशी कबुली सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. परंतु, या मालिकेचे सर्वच सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार असल्याने भारताला या खेळपट्टीवर कसा खेळ करायचा याचा लवकरच शोध लावावा लागणार आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर ८ विकेट राखून मात केली. भारताचा हा तीन महिन्यांत पहिलाच मर्यादित षटकांचा सामना होता. त्यामुळे लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांसारख्या प्रामुख्याने मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना लय सापडली नाही हे समजण्यासारखे आहे. परंतु, कर्णधार कोहलीच्या बॅटमधून धावा होत नसल्याची भारतीय संघाला नक्कीच चिंता असेल. या सामन्यात कोहली खातेही न उघडता माघारी परतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!