फुलंब्री : पारंपरिक शेती करत असताना बदल म्हणून फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील काही शेतकऱ्यांनी रेशीम लागवड केली असून ही रेशीमची शेती शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरत असल्याने येथील शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल चांगलीच वाढून त्यांच्या अर्थकारणाला बळ मिळाले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून व कमी खर्चात चांगले व हमखास उत्पन्न देणारी रेशीम शेती फायदेशीर ठरत आहे. रेशीमची झाडे लागवड व कोष तयार करण्यासाठी शेड व इतर आवश्यक साहित्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत असून तयार झालेले कोष विक्रीसाठी जालना येथील जवळची बाजारपेठ उपलब्ध असुन ३०० ते ४०० रूपये किलोपर्यंत याची खरेदी होत असल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा होत असल्याने ऊमरावती व परिसरातील बहुसंख्य शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. ऊमरावती येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेतीकडे वळले असुन येथील तेरा शेतकऱ्यांनी रेशीमची लागवड केली असुन त्यांना औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी अक्षय सिरसाठ व ऊमरावती येथील ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक नजमोद्दीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कृषिपिकाची मान्यता मिळाल्याने नुकसान भरपाई मिळणार
गेल्या काही वर्षापासुन शेतकरी रेशीम शेती करीत होते. मात्र,रेशीमचा कृषिपिकात समावेश नसल्याने काही नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती. आता राज्याच्या कृषी विभागाने रेशीमचा कृषिपिक म्हणून मान्यता दिल्याने शेतकरी वर्गास मोठा दिलासा मिळाला असुन नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- महावितरणाविरोधात भाजपचे ‘टाळे ठोको व हल्लाबोल’ आंदोलन
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
