Share

औरंगाबादेत रुग्णांची वाढ; २१ नवीन सेंटर सुरू होणार

Published On: 

औरंगाबाद: कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून परिस्थिती हाताबाहेर जाणायची भीती निर्माण होत आहे. अशातच कोविड केअर सेंटर अपुरे पडत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार कुठे करावे असा प्रश्न सध्या मनपा समोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता नवीन कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दररोज एक केंद्र मनपाला सुरु करावे लागत आहे.

मार्च महिना सुरु झाला तसं कोरोना चाचण्या जोमाने सुरु करण्यात आल्या. तपासणी दरम्यान रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. तसेच अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागत आहेत. दररोज चार ते पाच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. त्यातून कोरोनाबाधीतांची संख्या सुद्धा वाढत आहे. अनेक केंद्रांवर खाटा उपलब्ध नसल्याची तक्रार सुद्धा अनेकांकडून करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आता नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सामान्य नागरिक आर्थिक अडचणीमुळे महापालिकेच्याच कोविड केअर सेंटरवर अवलंबून आहे. त्यामुळे आता महापालिकेवर कोविड केअर सेंटर सुरु करण्याची मोठी जबाबदारी पडली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशातच एकाच कुटुंबातील तीन ते चार व्यक्ती बाधित आढळून येत असल्याचेही चित्र समोर येत आहे. कोविड केअर सेंटर मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भारती महापालिकेने सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!