Share

‘…मात्र महाराष्ट्र सरकार काही चेल्यांना हाताशी धरून वसुलीची योजना करतंय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर कधी वक्तव्यांमुळे त्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. याचमुळे त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलं आहे.

दरम्यान, मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. या सर्व प्रकरणावर भाजपने मात्र महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून राज्यातील कोरोना परिस्थिती आणि सचिन वाझे अटक प्रकरणावरुण ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एकीकडे नागपूरसारख्या शहरांना कोरोना रूग्ण भरती करण्यासही जागा मिळत नाहीये, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करीत आहे आणि त्यांच्याच काही चेल्यांकडून उद्योगपतींना घाबवरून वसुली करण्याची योजना केली जात आहे.’ अस ट्विट करून अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हॅशटॅग सचिन वाझे असं देखील ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

याआधीही, ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी अमृता फडणवीस यांनी सोडलेली नाही. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!