Share

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहता राज्याच्या गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा : माजी आ. भालेराव

Published On: 

🕒 1 min read

लातूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अल्यापासून राज्यात दलितांवर अन्याय व अत्याचार हे भरमसाठ वाढले आहे. राज्यातील सद्द स्थिती पाहता राज्याच्या गृहमंत्री अनील देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार तथा अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केली आहे. निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी आमदार सुधाकर भालेराव यावेळी म्हणाले की, ‘निलंगा तालुक्यात बामणी येथे जगन्नाथ शिंदे या युवकाचा खून झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलायला होती, पण पोलिसांनी केवळ दोनच आरोपींना अटक केली होती. आम्ही आंदोलने करत प्रशासनावर दबाव निर्माण केला आणि आज संपूर्ण आरोपी अटक करण्यात आले आहेत. पोलिसांनी या घटनेमागील खऱ्या आरोपींचा शोध घ्यावा अशी आमची मागणी आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक जिल्ह्यांत दलितांवर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे.’ असे ते म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहता राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. दलितावर होत असलेल्या अत्यचार व अन्यायाविरोधात आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत असे, माजी आमदार भालेराव यांनी पञकार परिषदेत सांगितले.याप्रसंगी गोविंद सूर्यवंशी, गंगाबाई कांबळे, सत्याभाई शिंदे, संजय हलगरकर, अजय कांबळे, सोमनाथ कदम, सतिश शिंदे, सिताराम कांबळे, राम कांबळे, बजरंग कांबळे, प्रदीप थोरात, ओम शिंदे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!