Share

पहिल्या क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित- मोहन भागवत

Published On: 

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ५ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या मुहुर्तावर वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे अनावरण केले. तद्पश्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagawat) यांनी या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली. तसेच पहिल्या क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित, असे भागवत म्हणाले.

यावेळी बोलत असतांना मोहन भागवत म्हणाले की,‘पहिला क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित’, तसेच माझे स्वतःचे हित, माझ्या कुटुंबाचे हित, माझ्या भाषेचे हित, माझ्या जातीचे हित, माझ्या प्रांताचे हित, माझ्या पंथाचे हित, हे नेहमीच दुसऱ्या स्थानावर आहे, असेही भागवत म्हणाले. पुढे ते म्हणाले की,‘आपण स्वाभिमानाने जगू आणि विश्वाचे पालनपोषण करू. तसेच हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही. ज्यांना आमचा नाश करायचा आहे ते पोकळ होत आहेत’, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलत असतांना ‘शंकराचार्यानंतर रामानुजाचार्यांनी मोठे काम केले आहे. शंकराचार्याने सर्व मतमतांतरे एकत्र करून देशाला एकत्र केले तर रामनाजुचार्यांनी जीवन कवनाने सर्व देशाला सनातन धर्माशी जोडण्याचे काम केले. फक्त इतकेच नाही तर कुरिवाज, कुप्रथा त्यांनी आपल्या कर्माने बदलल्या’, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!