🕒 1 min read
पुणे : यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी केली होत. परंतु आता हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपुरात तेव्हढी जागा नाही, असे कारणही अजित पवार यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपुरात तेव्हढी जागा नाही. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत होणार आहे. अधिवेशन कमी दिवसांचे केले तर विरोधक पळवाट काढली असे म्हणतात.’ तसेच ‘पुढच्या काळात विदर्भालाही न्याय देऊ तिथेही अधिवेशन घेऊ’, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झाली. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षात एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही.
महत्वाच्या बातम्या:
-
अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा क्रांती चौकातील पुतळा अनावरण साठी सज्ज
-
‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
-
अमरावती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारपर्यंत काम बंद आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
