Share

नाना पटोलेंमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस बदनाम-संजय केणेकर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(Narendra Modi) बोलण्याइतके नाना पटोले मोठे नाही. काँग्रेसच्या राजकारणात पागलांची मोठी फौज आहे. पंतप्रधानांवर बोलण्या इतके पटोले मोठे नाही. नाना पटोलेंमुळे(Nana Patole) महाराष्ट्रातील काँग्रेस बदनाम झाली आहे. असा आरोप भाजप शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकरांनी केला आहे. तसेच त्यांची मला कीव येते. आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मात्र काँग्रेसला सद्बुद्धी मिळो.  पंतप्रधान मोदींसोबत जे घडले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. असा इशाराही त्यांनी केला.

यावेळी बोलतांना पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमध्ये ४० हजार करोड रुपयांचे विकासात्मक कार्याचे उद्घाटन व लोकार्पण करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. परंतु काँग्रेस शासित सरकार व नेते पंजाब मध्ये असल्यामुळे त्यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या वेळी जाणीव पूर्वक त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल याप्रकारचे कृत्य केले. पंतप्रधान ज्यावेळेस हुसेनीवाला येथील शहीद स्मारकला अभिवादन करण्यासाठी जात होते, त्या वेळी जाणीवपूर्वक त्यांच्या रस्त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते घुसवण्यात आले.

त्यांचा रस्ता आडवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य केले. या षडयंत्रामध्ये दिल्ली मधील काँग्रेसचे नेते हे पडद्याआडून सहभागी असतील असा थेट आरोप औरंगाबाद मधील आक्रमक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेस आज जनतेमधून नामशेष झालेली आहे. त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे त्यांचे कर्दनकाळ ठरले. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या बाबतीत बरेवाईट करण्यासाठीच अशा प्रकारचे षड्यंत्र केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!