Share

नागपूरला पूरस्थिती असती, तर मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले नसते

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील पूरपरिस्थिती मुळे राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र विरोधक राज्यसरकारवर टीका करताना दिसत आहे.

जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सांगली आणि कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती नागपूरला घडली असती, तर मंत्री भाषणं देत फिरले असते का? असा खोचक सवाल चव्हाणांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच पुढे बोलताना ‘फडणवीस सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आकसाचा आहे. त्यामुळेच महापुराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले.’ असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तेथे काही लक्ष द्यायची गरज नाही, हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने थोडं गांभीर्याने पाहायला हवं, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!