🕒 1 min read
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अगोदर ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून वादंग उठले असतानाच त्यांनी पुन्हा एकदा ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’ असे म्हटले आहे. आता यावरूनच भाजपकडून त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे.
दरम्यान या वक्तव्यावरही त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. एका गावगुंडाचं भाजप इतकं समर्थन का करत आहे? भाजपला जाळायचे असतील तर बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे जाळा. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर, ‘काँग्रेस नेहमी गावगुंडाविरोधात राहणार. ते त्याचा अर्थ काय लावत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. माझे पुतळे जाळण्याची, उद्धार करण्याची प्रक्रिया किती दिवस सुरु ठेवायची ते ठेवावं. पोलीस यासंबंधी कारवाई करतील. पण राज्यात कोरोनाची स्थिती असतानाही आंदोलन कशाला? गावगुंडासाठी इतकं प्रेम का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान भाजपने जो न्याय नारायण राणेंसाठी होता तोच नाना पटोले यांच्यासाठी असावा, अशी मागणी केली आहे. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणेंचं आणि माझं वक्तव्य काय होतं? मी प्रधानमंत्र्यांविरोधात बोललो नसून गावगुंडाबाबत बोललो. तो गावगुंड समोर आला असताना बालहट्ट कशासाठी? भाजपकडून मूळ प्रश्नापासून लोकांना दूर नेलं जात आहे. सुसंस्कृत पक्षाचे लोक आहात तर मग महिला, मुलींचा अपमान करणाऱ्यांना काही बोलणार नाही का? आत कुठे गेली अक्कल? असा संतप्त सवालही नाना पटोले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या, बुरसटलेल्या विचारांच्या नाना पटोलेंचे शुद्धीकरण करणे गरजेचे”
- डेव्हिड वॉर्नरने केलेल्या श्रीवल्ली डान्सस्टेप्सवर, अल्लू अर्जूनने केली कमेंट
- वामिकाचे फोटो व्हायरल होताच विराटने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..
- “मुख्यमंत्री ठाकरे काल जनतेसमोर आले अन् विरोधकांचे धाबे दणाणले”
- “हे राज्य नेमके कोणते मुख्यमंत्री चालवतात?”, आ. अतुल भातखळकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
