Share

‘त्यांचा स्वबळाचा आग्रह ‘शेवटपर्यंत’ टिकला तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रच लढणार’

Published On: 

उस्मानाबाद : राज्यात काँग्रेसकडून सतत स्वबळाची भाषा वापरली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही काँग्रेस नेत्यांची भूमिका कायम आहे. मात्र, आता यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच राहू. जर त्यांचा आग्रहच असेल स्वबळावर लढण्याचा आणि तो ‘शेवटपर्यंत’ टिकला तर किमान राष्ट्रवादी व शिवसेना तरी एकत्रच लढेल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी काँग्रेसला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील परिवार संवाद यात्रेची सुरुवात आज तुळजापूर येथून तुळजाभवानीच्या द्वारातून करण्यात आली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, रुपाली चाकणकर, महेबुब शेख इत्यादी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ही यात्रा म्हणजे स्वबळाची चाचपणी नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष समजूतदार आहेत. आम्ही एकत्रच राहू. काँग्रेसही आमच्यासोबतच राहील, अशी मला खात्री वाटते.

नाना पटोले दिल्लीला रवाना
महाविकास आघाडीतील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!