🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले. परभणीत आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होत.
दानवे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा, असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी ‘सामना’ला मुलाखत दिली. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा दणकाच त्यांनी सुरुवातीला दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. विरोधक सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा कडक समाचार देखील घेतला.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना आता ‘हे’ करणे अनिवार्य असेल
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक
- ‘तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ ईडीच्या कारवाईनंतर ठाकरेंचा थेट इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
