Share

‘राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलीस यंत्रणा दरोडेखोरांना कसं पकडणार?’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीनजवळ तोंडोळी (ता. पैठण) येथील शेतवस्तीत राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री ११ च्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला चढवला. घरातील पुरुषांना दोरीने बांधून १५ हजारांची लूट केली. इतकेच नव्हे तर घरातील दोन महिलांवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कारही केला. या महिलांना उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक पीडिता पाच महिन्यांच्या बाळाची आई आहे. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

सरकारचा धाकच नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे. पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील दरोडा आणि अत्याचाराची घटना त्याचेच प्रतीक आहे. सरकारने या पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. वाघ यांनी घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

त्या म्हणाल्या, राज्यातील मंत्री पोलिस बदल्यांत ‘मलई‘ खाण्यात व्यस्त आहे. सक्षम पोलिस अधिकारी बाजूला फेकले गेलेत. त्याचाच परिणाम कायदा सुव्यवस्थेवर दिसतो. गुन्हेगारी वाढलीय. राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलिस यंत्रणा औरंगाबाद घटनेतील दरोडेखोरांना कसं पकडणार? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!